| तारीख | सुरवातीचा काळ | शेवटचा काळ |
|---|---|---|
| बुधवार, 25 जानेवारी | 17:42:35 | 29:41:37 |
| शुक्रवार, 27 जानेवारी | 07:12:02 | 18:37:44 |
| सोमवार, 30 जानेवारी | 15:46:54 | 31:10:41 |
| गुरुवार, 16 फेब्रुवारी | 14:11:27 | 30:59:11 |
| शुक्रवार, 17 फेब्रुवारी | 06:58:20 | 13:44:07 |
| बुधवार, 22 फेब्रुवारी | 06:53:49 | 18:27:13 |
| गुरुवार, 23 फेब्रुवारी | 18:00:39 | 24:02:52 |
| सोमवार, 06 मार्च | 08:47:48 | 30:41:38 |
| बुधवार, 08 मार्च | 07:29:00 | 15:08:43 |
| शनिवार, 11 मार्च | 17:06:36 | 30:36:07 |
| बुधवार, 15 मार्च | 21:57:35 | 30:31:36 |
| गुरुवार, 16 मार्च | 06:30:28 | 24:46:27 |
| शुक्रवार, 05 मे | 05:37:35 | 29:28:09 |
| बुधवार, 10 मे | 07:26:28 | 17:00:55 |
| सोमवार, 15 मे | 05:30:37 | 13:45:37 |
| शुक्रवार, 19 मे | 19:06:36 | 29:28:25 |
| शनिवार, 20 मे | 05:27:55 | 29:27:55 |
| शनिवार, 27 मे | 07:36:10 | 29:25:01 |
| सोमवार, 12 जून | 05:22:35 | 29:22:35 |
| बुधवार, 22 नोव्हेंबर | 06:48:52 | 29:03:12 |
| सोमवार, 27 नोव्हेंबर | 06:52:51 | 30:52:51 |
| बुधवार, 06 डिसेंबर | 12:51:59 | 25:39:09 |
| बुधवार, 13 डिसेंबर | 22:43:15 | 33:12:30 |
| गुरुवार, 21 डिसेंबर | 07:09:21 | 15:43:26 |
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गृह प्रवेश एक महत्वपूर्ण क्षण असतो कारण, कठीण मेहनत आणि अधिक प्रयत्नानंतर घराचे स्वप्न साकार होते, म्हणून शुभ मुहूर्तात गृह प्रवेशाचे विशेष महत्व आहे. शुभ वेळ आणि तिथी वर गृह प्रवेश केल्याने घरात शांतता, समृद्धी आणि आनंद येतो. गृह प्रवेशाच्या मुहूर्ताचे निर्धारण तिथी, मुहूर्त, लग्न आणि वार इत्यादींच्या आधारावर केले जाते.
●शाश्त्रात माघ, फाल्गुन, वैशाख, जेष्ठ महिना गृह प्रवेशासाठी सर्वात उत्तम महिने मानले गेले आहे.
●चातुर्मास अर्थात आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन च्या महिन्यात गृह प्रवेश करणे निषेध असते कारण, हा काळ भगवान विष्णू सोबत सर्व देवी-देवतांची शयनाची वेळ असते. या व्यतिरिक्त पौष महिनाही गृह प्रवेश साठी शुभ मानला जात नाही.
●मंगळवार सोडून अन्य सर्व दिवसात गृह प्रवेश केला जाऊ शकतो. तथापि काही विशेष परिस्थितीमध्ये रविवारी आणि शनिवारच्या दिवशीही ग्रह प्रवेश करणे वर्जित असते.
●अमावस्या व पौर्णिमेची तिथी सोडून शुक्ल पक्षाच्या द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी तिथी गृह प्रवेशासाठी शुभ मानली जाते.
●गृह प्रवेश स्थिर लग्नात केला पाहिजे. गृह प्रवेशाच्या वेळी तुमच्या जन्म नक्षत्रात सुर्याची स्थिती पाचव्यात अशुभ, आठव्यात शुभ, नवव्यात अशुभ आणि सहाव्यात शुभ आहे.
सामान्यतः ही धारणा राहिलेली आहे की गृह प्रवेश नेहमी नवीन घरात राहण्यासाठी केला जातो परंतु ही धारणा योग्य नाही. वास्तु शाश्त्रानुसार गृह प्रवेश ३ प्रकारचे असतात:
●अपूर्व: जेव्हा नवीन घरात राहण्यास जातात, तर ते ‘अपूर्व’ गृह प्रवेश म्हटले जाते.
●सपूर्व: जर कुठल्या कारणास्तव आपण कुठल्या दुसऱ्या स्थानावर राहायला जातो आणि आपले घर रिकामे सोडून देतात तर या नंतर जेव्हा आपण पुन्हा घरात परत येतो तर, यास ‘सपूर्व’ गृह प्रवेश म्हटले जाते.
●द्वान्धव: प्राकृतिक आपदा अथवा कुणाच्या त्रासामुळे जेव्हा मजबुरी मध्ये घर सोडावे लागते. या नंतर परत घरात राहण्यासाठी पुजा पाठ केले जातात, तर त्यास ‘द्वान्धव’ गृह प्रवेश म्हटले जाते.
वास्तु शाश्त्र प्राचीन भारतीय विज्ञान आहे. यामध्ये दिशांच्या महत्वाला दर्शविलेले आहे. वास्तु ने तात्पर्य आहे एक अशे स्थान जिथे देव आणि मनुष्य एक सोबत राहतात. मानव शरीर पाच तत्वांनी बनलेले आहे आणि वास्तूचे संबंध या पाच तत्वांनी मानले जाते. वास्तु शास्त्राच्या अनुसार प्रत्येक दिशेत देवतांचा वास असतो. प्रत्येक दिशेतून मिळणारी ऊर्जा आपल्या जीवनात सकारात्मक वातावरण, सुख शांती आणि समृद्धी प्रदान करते, म्हणून गृह प्रवेशाच्या पूर्व वास्तु पुजा आणि वास्तु शांती करणे गरजेचे आहे.
कधी कधी आपण अर्धे अधुरे बनलेल्या घरात प्रवेश करून घेतो परंतु, हे योग्य मानले जात नाही. शास्त्रामध्ये गृह प्रवेशाचे काही विधान सांगितले आहे, ज्याचे पालन अवश्य केले पाहिजे.
●जोपर्यंत घरात दार लावले जात नाही, विशेषतः मुख्य द्वार वर, आणि घरातील छत पूर्णतः चांगल्या प्रकारे बनत नाही, तोपर्यंत गृह प्रवेश करणे टाळायला हवे.
●गृह प्रवेशाच्या नंतर प्रयत्न करा की घराच्या मुख्य दाराला लॉक लावू नका. कारण असे करणे अशुभ मानले आहे.
विशेष: गृह प्रवेशाच्या संबंधात दिले गेलेले हे सर्व विचार धार्मिक दृष्टीने महत्वपूर्ण आहे. तथापि गृह प्रवेशाने पूर्व वास्तु शांती आणि अन्य कार्यांसाठी विद्वान ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्या.